Breaking News

या ५ गोष्टींमुळे पतीला येते पत्नीवर डाऊट , त्यामुळे पत्नींनी ह्या ५ गोष्टींची नेहमी काळजी घ्यायला हवी अन्यथा ..

वैवाहिक जीवनात पती-पत्नींचा एकमेकांवरचा विश्वास हा खूप महत्वाचा असतो. तो जर नसेल, तर बर्याच वेळा संश यामुळे त्यांच्यातील नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. आपल्या पत्नीच्या कोणत्याही कृतीबद्दल सं शय घेणारे काही पती असतात. संशय ही खूप घा तक गोष्ट आहे, जो पती-पत्नीच्या नात्यात आला, तर माणूस है वान बनू शकतो.

नवरा-बायकोच्या नात्यांमध्ये संशयाला जागा फक्त तिसर्या व्यक्तीच्या आगमनाने होते असे नाही, तर कोणत्याही क्षणाला तिथे संशयाला वाव असतो. म्हणून, दोघांची ही जबाबदारी आहे, की आपले नाते उत्तम राखले गेले पाहिजे, संशयाची सुई आपल्या नात्यात आली, तरी एकमेकांना समजून घेऊन, नाते कमकुवत होऊ देऊ नये. कारण अशा परिस्थितीतच नाते कमकुवत होते.

नाते कोणतेही असो, मैत्रीचे असो, पती-पत्नीचे असो, भाऊ बहिणीचे असो, ते विश्वासावर टिकून राहाते. जर विश्वास डळमळला तर नाते तुटायला वेळ लागत नाही. पण ते नाते जर पती-पत्नीचे असेल तर ते भावनाप्रधान व अतिशय नाजुक सं बंधांचे, नाजुक धाग्याने बांधलेले असते. विश्वास हा एकमेकांना नाजुक धाग्यांनी बांधून ठेवण्याचे एक साधन आहे.

असे म्हणतात, जिथे विश्वास आहे, तिथे प्रेम टिकून राहाते नाहीतर नाही. परंतु या शब्दाला देखील एक ठराविक मर्यादा आहे, जी ओलांडली गेली तर नाती तुटतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे पती आपल्या पत्नीवर संशय घेतात. तर आमच्या आजच्या या लेखामध्ये आपल्यासाठी काय नवीन व खास आहे ते जाणून घेऊया. अशाच काही कृती ज्या पतीला पत्नीवर संशय घेण्यास भाग पाडतात.

१. मोबाइलवर जास्त वेळ बोलणे- जर एखादी लग्न झालेली स्त्री मोबाईलवर जास्त वेळ बोलत असेल अथवा व्हॉट्स एप फेसबुकवर अधिक सक्रिय राहत असेल तर तिच्या नवऱ्याच्या मनात संशय येऊ शकतो, की ती इतका कालावधी कोणाशी बोलत आहे, सतत फेसबूकवर काय नोट्स टाकते आहे. त्यामुळे पतीच्या मनात शंका येऊ शकते. ही शंका याला ठोस कारण असण्याची काही जरूर नाही.

२. पतीच्या घरी नसताना बराच वेळ बाहेर राहाणे- जर एखादी महिला आपल्या पतीच्या अनुपस्थितीत सतत एकटी घराबाहेर जात असेल तर ती पतीच्या शंकेस किंवा संशयास पात्र ठरू शकते. आपण कोठे जात आहोत, हे पत्नीने पतीला बाहेर पडण्याआधी सांगितले, तर संशयाला जागा राहाणार नाही.

3. पर-पुरुषांसोबत पार्टीत धमाल करणे- स्त्रिया जेव्हा पार्टीमध्ये जातात आणि आपल्या पती व्यतिरिक्त अन्य पुरुषांशी जास्त संवाद साधण्याचा प्रयत्न करतात, तर ते त्यांच्या नवऱ्याला पटणे शक्यच नसते, आणि त्याचे रूपांतर मग संशयामध्ये होऊ शकते.

४. पत्नीचा जास्त शृंगार- स्त्रियांना नेहमीच शृंगार करणे, मेकअप करणे, सजणे हे सामान्यत: पुरुषांपेक्षा जास्त आवडते. सौंदर्यप्रसाधनाचा वापर हा स्त्रियांमध्ये नेहमीच जास्त प्रमाणात असतो. परंतु हेच पुरुषांसाठी महिलांवर संशय घेण्याचे कारण ठरू शकते.

५. ऑफिस मधील गोष्टींची घरी चर्चा करणे- जर एखादी स्त्री आपल्या पतीसमोर आपल्या ऑफिसच्या सहकार्याचसं बंधी अधिक बोलत असेल, त्याच्या मदतीची चर्चा करत असेल, तर तिच्या पतीच्या मनात शंका निर्माण होऊ शकते.

आजच्या काळात जरी स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, सगळ्या क्षेत्रात आघाडीवर आहे, तरी पुरुषी मानसिकता असलेल्या आपल्या समाजाला ते मान्य नाही. कोणत्याही ठोस कारणाशिवाय त्यांच्या मनात स्त्रीबद्दल संशयाचे बीज निर्माण होऊ शकते, जे पूर्णपणे चुकीचे आहे.

६. जास्त काळजी घेणे- पत्नीच्या स्वभावाचा अंदाज करता येणे कठीण आहे. कधीकधी पत्नीचे वागणे खूप वेगळे असते. अशा वेळी, जर पत्नीने आपल्या पतीची अधिक काळजी घ्यायला सुरुवात केली तर पतीला वाटते की काहीतरी चुकते आहे.

याबद्दल त्याला संशय येऊ लागतो. अशा परिस्थितीत जर नवरा आपल्याबद्दल शंका घेत असेल, तर त्याला समजावून सांगणे हे आपले कर्तव्य आहे. नवरा- बायको यामध्ये चांगला सुसंवाद असणे हे वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे.

About admin

Check Also

Three big decisions of Modi government which affected the Indian economy

Like previous two years, in the last year too Prime Minister Narendra Modi managed to …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *