Breaking News

वयाच्या 68 व्या वर्षापर्यंत खेळणारा भारताचा पहिला कर्णधार, ज्याचा सिक्सर शहराबाहेर गेला होता…

31 ऑक्टोबर 2019 या दिवशी भारताचा पहिला कर्णधार कोतारी कनकय्या नायडू यांची 124 वी जयंती असून त्यांना सीके नायडू म्हणून देखील ओळखले जाते. नायडूंचा जन्म 31 ऑक्टोबर 1895 रोजी नागपुरात झाला होता.

१९३२ मध्ये भारतीय संघाच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्यांनी लॉर्ड्स येथे भारताचे नेतृत्व केले. त्याच सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्यांच्या हातालाही दुखापत झाली तरीही ते खेळत राहिले आणि पहिल्या डावात 40 धावा केल्या. विशेष म्हणजे उजव्या हाताच्या या फलंदाजाने वयाच्या 37 व्या वर्षी भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

31 ऑक्टोबर रोजी झाला सीके नायडू यांचा जन्म:-

अशाप्रकारे पहिल्या सामन्यात ते भारताचा कर्णधार बनले आणि टीम इंडियाचा हा पहिलाच कसोटी सामना होता. त्यावेळी फक्त कसोटी सामने असयाचे आणि तेही फारसे होत नव्हते. नायडू चार वर्षे कसोटी क्रिकेट खेळले नायडूने भारतासाठी फक्त 7 कसोटी सामने खेळले.

25 च्या सरासरीने 350 धावा केल्या. कसोटी कारकीर्दीत त्यांनी ९ विकेट घेतले. यानंतर नायडू फर्स्ट क्लॉज क्रिकेटमध्ये परतले आणि बरीच वर्षे येथे त्यांनी खेळली.

या फलंदाजाने 207 प्रथम श्रेणी सामने खेळले आणि 35.94 च्या सरासरीने 11,825 धावा केल्या. त्यांनी 26 शतके आणि 58 अर्धशतके झळकावली आहेत. नायडूने ऑफ-ब्रेकही ब्वालिंग देखील केली आणि त्यामध्ये त्यांनी 411 विकेट्स देखील घेतली.

वयाच्या 68 व्या वर्षी खेळला शेवटचा क्रिकेट सामना:-

मर्यादित कसोटी कारकीर्द असूनही नायडू यांचे नाव जगातील काही अशा क्रिकेटपटूंपैकी आहे ज्यांनी बर्‍याच दिवसांपासून क्रिकेट खेळला आहे. शेवटचा पहिला क्लॉज सामना खेळताना नायडू 68 वर्षांचे होते.

निवृत्तीपूर्वी नायडूनी प्रथम श्रेणी सामन्यात बरेच धावा केल्या. १९२६ मध्ये मेरीलेबोन क्रिकेट क्लबने भारत दौरा केला तेव्हा नायडूनी एक शानदार डाव खेळला. त्यांनी 116 मिनिटांत 153 धावा ठोकल्या. नायडूने १९६३-६४ च्या सिजनमध्ये वयाच्या 68 व्या वर्षी शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळला.

तो सिक्सर ज्याने शहर ओलांडले:-

ज्यावेळी नायडू क्रिकेट खेळत असत त्यावेळी फलंदाजीमध्ये बचाव करणे एक कला मानली जायची. त्यावेळी टी -२० क्रिकेट फार दूर वनडे क्रिकेट देखील सुरु झाले नव्हते म्हणून जेव्हा फलंदाजांनी षटकार मारयाचे तेव्हा ती एक मोठी गोष्ट मानली जात असे.

नायडूनेदेखील त्यांच्या कारकिर्दीत अशाच प्रकारचा षटकार ठोकला जो खेळण्याच्या कारकीर्दीत एक मोठा किस्सा म्हणून उदयास आला. नायडू इंग्लंडला गेलेला हा काळ आहे.

यावेळी दुसर्‍या शहरात त्यांचा सिक्सर गेला. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु हे सत्य आहे. असे म्हटले जाते की ज्या मैदानावर हा सामना खेळला जात होता ते मैदान इंग्लंडचे दोन शहर काउंटी वॉरविकशायर आणि वॉस्टरशायर यांच्या सीमेवर होते.

भौगोलिकदृष्ट्या एका नदीने दोघांची सीमा तयार केली. नायडू च्या सिक्सर ने ही नदी पार केली होती. या सिक्सरची लांबी 115 मीटर असल्याचे सांगितले जाते.

सीके नायडू लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार:-

१९५६ मध्ये नायडू यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आणि त्यांच्या नावावर एक पुरस्कारही देण्यात येतो. २००६ पासून भारतीय क्रिकेट बोर्डाने सीके नायडू यांच्या नावे पुरस्कार जाहीर केला आहे. दरवर्षी मग एका किंवा इतर खेळाडूला सीके नायडू लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित केले जाते.

सर्व संख्या आणि कर्तृत्त्वे असूनही त्यांच्याबद्दलची सर्वात मनोरंजक गोष्ट अशी आहे की १९४१ मध्ये बाथगेट लिव्हर टॉनिक या ब्रँडची जाहिरात करणारे ते पहिला खेळाडू होता. हा एक काळ होता जेव्हा लोक मैदानाबाहेर बर्‍याच खेळाडूंच्या इन-कॅमेरा कामावर प्रश्न विचारत असत त्यावेळी नायडू एका कंपनीचा चेहरा बनले होते.

About admin

Check Also

Three big decisions of Modi government which affected the Indian economy

Like previous two years, in the last year too Prime Minister Narendra Modi managed to …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *