बिग बॉस १३ ची स्पर्धक अभिनेत्री रश्मी देसाई हिंदी टीव्हीसृष्टीतलं एक नावाजलेलं नाव. सध्या रश्मी तिच्या कामामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिचं खासगी आयुष्यात अनेक चढ- उतारांनी भरलेलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ती कोणत्याही मालिकेत दिसली नसली तरी बिग बॉसमधून ती स्वतःचं नाव चर्चेत ठेवण्यात यश मिळवत आहे.
रश्मी देसाई टीव्ही जगातील एक नामांकित अभिनेत्री बनली आहे आणि आजकाल ती बिग बॉस 13 झाल्यापासून दररोज चर्चेमध्ये आहे. पण तुम्ही रशमीला प्रसिध्द टीव्ही शो उतरण आणि परी हूं मैं मध्ये पाहिले असेल ज्यामुळे तिला सर्वांच्या हृदयात स्थान मिळाले आणि या मालिकेतूनच ती घरा घरात ओळखली गेली.
पण तुम्हाला माहिती आहे का की रश्मी देसाई बिग बॉस 13 मधील सर्वाधिक फी घेणारी स्पर्धक आहेत. होय रश्मीचा प्रवास खूप कठीण झाला आहे तिला तिच्या कारकिर्दीपासून वैयक्तिक आयुष्यापर्यंत अनेक चढ-उतार सहन करावे लागले आहेत. हा शेवट कसा गाठायचा हे फारच थोड्या लोकांना माहित आहे.
तिच्या आयुष्याबद्दल बोलण्यापूर्वी आम्ही आपल्याला सांगू की रश्मीचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत होते आणि तिच्या घराच्या गरजा भागविल्या जात नव्हत्या. याच कारणामुळे रश्मीला अगदी लहान वयातच कामाला जावे लागले होते.
यासाठी रश्मीने प्रथम करिअरची सुरुवात भोजपुरी चित्रपटांद्वारे केली पण तिची मेहनत पाहून ती टीव्ही मालिकांमध्येही दिसली आणि त्यानंतर तिने भोजपुरी इंडस्ट्री सोडली.
तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलले तर तिने सुपरहिट सीरियल उतरण या चित्रपटाचा सह अभिनेता नंदिश संधूशी छुप्या पद्धतीने लग्न केले होते. पण दोघांचे नातं फार काळ टिकू शकला नाही आणि ते चार वर्षांनंतर वेगळे झाले.
इतकेच नाही तर एका रियलिटी शोच्या वेळी रश्मीने तिच्या गर्भपात बद्दलही खुलासा केला होता आणि या शोमध्ये रश्मीने तिच्या आणि नंदिश संधूच्या घटस्फोटाचे कारण सांगितले.
रश्मीने घटस्फोटाचं कारण नंदिशच्या अनेक मैत्रिणी आणि त्याचं फ्लर्ट करणं सांगितलं होतं. तर नंदिशने त्यांचं लग्न तुटायला रश्मीचा पझेसिव्हनेस मारक ठरल्याचं सांगितलं. दरम्यान त्यांच्या घटस्फोटाच्या काळात नंदिशचे अनेक मुलींसोबतचे फोटो व्हायरल झाले होते.
नंदिश संधूच्या मित्रांच्या मते रश्मीचं पझेसिव्ह स्वभावामुळेत त्यांचं नातं तुटल्याचं सांगितलं. दोघांच्या सततच्या भांडणामुळे अनेक महिने वेगवेगळे राहत होते. एका मुलाखतीत रश्मीने सांगितलं की जर नंदिशने या नात्यात स्वतःचे १०० टक्के दिले असते तर सर्व काही ठीक असतं. मला त्याच्या मैत्रिणींपासून काहीच त्रास नव्हता. मी कधीच त्याच्यावर संशय घेतला नाही.
मी माझ्या कामात आणि प्रवासात व्यग्र असायचे. मला आचा माहीत नाही की तो कोणाला डेट करत आहे की नाही.. जर तो डेट करत असेल तरती त्याने ते नातं एन्जॉय केलं पाहिजे. याआधीही नंदिश संधूचं नाव अनेक मुलींसोबत जोडलं गेलं आहे.
घ टस्फोटानंतर रश्मीचं नावही अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं. या दिवसांत रश्मीच्या आयुष्यात अरहान खान आहे.
वर्ष 2018 मध्ये रश्मी टीव्हीच्या सर्वाधिक पगाराच्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली. रश्मीने रावण या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत प्रवेश केला त्यानंतर परी हूं मैं आणि उतरन ने तिला प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान मिळवून दिलं.