१९७६ मध्ये मृगया चित्रपटामधून आपल्या करियरची सुरवात करणाऱ्या मिथुन चक्रवर्तीला देशातील सुपरस्टार मानले जाते. त्यांना आजही अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम करताना आपण पाहत असतो.
असे म्हंटले जाते कि काळानुसार मिथुन चक्रवर्तीचा अभिनय अधिक उत्कृष्ठ होत चालला आहे. एक काळ असा होता कि जेव्हा मिथुन चक्रवर्ती बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक मानले जात होते.
मिथुन चक्रवर्ती जितके अधिक आपल्या प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेमध्ये राहिले तितकेच ते पर्सनल लाइफमुळे देखील चर्चेमध्ये राहिले. त्यांच्याबद्दल असे म्हंटले जाते कि त्यांनी आपल्या लाईफमध्ये तीन लग्न केली आहेत. अभिनेता मिथुन चक्रवर्तीच्या श्रीदेवी सोबतच्या लग्नाबद्दल बातम्या देखील समोर आल्या होत्या.
मिथुन चक्रवर्तीने केले आहेत तीन लग्न
मिथुन चक्रवर्ती बॉलीवूडमधील पहिले असे अभिनेता आहेत ज्यांचे चित्रपट कमी बजटचे असून देखील करोडोंचा बिनजनेस करत होते. मिथुन चक्रवर्तीचे लहानपणीचे नाव गौरांग चक्रवर्ती होते.
जे त्यांनी बॉलीवूडमध्ये आल्यानंतर बदलले होते. १६ जून १९५० रोजी जन्मलेले मिथुन चक्रवर्ती आजसुद्धा अनेक चित्रपटांमध्ये काम करत आहेत. पण बॉलीवूडच्या या प्रसिद्ध डिस्को डांसरचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे.
मिथुन चक्रवर्तीने दोन लग्न केले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव हेलेना ल्यूक आहे. हेलेना ७० च्या दशकामध्ये फॅशन जगतामध्ये खूप प्रसिद्ध होती.
लग्नाच्या काही वर्षानंतरच त्यांचा घटस्फोट झाला. बॉलीवूड अभिनेत्री हेलेनाने चार चित्रपट केल्यानंतर बॉलीवूडच्या जगतामधून काढता पाय घेतला. मिथुनची पहिली पत्नी हेलेना ल्यूकने १९८० मध्ये बॉलीवूड चित्रपट जुदाई मधून डेब्यू केला होता.
यानंतर ती साथ साथ आणि एक नया रिश्ता मध्ये दिसली होती. त्यांचा घटस्फोटाचे मुख्य कारण अभिनेत्री योगिता बालीसोबत अफेयर होते. हेलेनानंतर मिथुनने योगिता बालीसोबत लग्न केले.
जसे कि आपल्याला माहिती आहे कि दुबईच्या हॉटेलमध्ये बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचे निधन झाले होते. तिच्या अंत्यदर्शनाला पूर्ण बॉलीवूड पोहोचले होते पण मिथुन चक्रवर्तीला कुठेही पाहिले गेले नव्हते आणि ना हि त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली.
मिथुनने श्रीदेवीसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एक काळ असा होता कि मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवीच्या अफेयरच्या चर्चा उघडपणे होत होत्या.
असे सुद्धा म्हंटले जाते कि मिथुन आणि श्रीदेवीने जगापासून लपून लग्न केले होते. पण हि गोष्ट आतापर्यंत स्पष्ट झाली नाही कि त्यांनी लग्न केले होते का नव्हते.
श्रीदेवी आणि मिथुनने वतन के रखवाले, जाग उठा इंसान, वक्त की आवाज आणि गुरु सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. एक वेळ अशी होती कि हि जोडी अफेयर आणि लग्नाच्या बातमीमुळे चर्चेमध्ये होती.
भले हि बातमी खरी ठरली नाही पण श्रीदेवीला आजही मिथुनची तिसरी पत्नी मानले जाते. असे म्हंटले जाते कि १९८५ मध्ये अभिनेता मिथुन चक्रवर्तीने श्रीदेवीसोबत लग्न केले होते.