ग्लॅमरस गोष्टींनी भरलेल्या जगात सगळ काही माफ आहे. कोणत्या पण स्टार्स विषयी बोला ते त्यांचे आयुष्य त्यांच्या स्वतःप्रमाणे जगतात. राहिली गोष्ट समाज आणि परंपरेची तर यावर विश्वास ठेवणारे असे काही मोजकेच स्टार्सच आहेत.
सर्वसाधारणपणे असे बरेच स्टार्स आहेत जे लग्नानंतर आपले आयुष्य आनंदाने घालवत आहेत परंतु आज आम्ही तुम्हाला अशा काही स्टार्सशी ओळख करुन देणार आहोत जे लग्न न करता पती-पत्नी सारखे एकमेकांसोबत राहत होते. यातील जोडपे एकमेकांसोबत लिव्ह इन मध्ये राहिले आहेत.
तनिषा मुखर्जी आणि अरमान कोहली:- या यादीमध्ये आपण पहिली गोष्ट सांगणार आहोत ती म्हणजे बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री तनिषा मुखर्जी जी आता 40 वर्षांची आहे आणि काजोलची धाकटी बहीण आहे पण आपणास आश्चर्य वाटेल की तिने अद्याप लग्न केले नाही.
होय तनिशाने बर्याच चित्रपटांमध्ये काम केले होते परंतु तिचे बहुतेक सर्व चित्रपट फ्लॉप झाले आहेत. जर पाहिले गेले तर तनिषा एकदा बिग बॉसमध्ये आली होती तिथे तिची भेट अरमान कोहलीशी झाली होती. तेव्हापासून त्यांचे सं-बंध जोडले गेले दोघेही एकत्र राहू लागले. पण लवकरच त्यांचे नाते दु: खाने संपले.
शमिता शेट्टी आणि मनोज वाजपेयी:- यापैकी दुसरी जोडी म्हणजे प्रसिद्ध बॉलीवूड स्टार मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री शमिता शेट्टी. शमिता शेट्टी ही शिल्पा शेट्टीची बहीण आहे.
तिने अद्याप लग्न केलेले नाही परंतु असे म्हटले जाते की हे दोघे लिव्ह इन मध्ये जगत होते पण दुर्दैवाने हे सं-बंध फार काळ टिकू शकले नाहीत आणि काही दिवसांनंतर ते दोघेही वेगळे झाले आणि नंतर मनोजने अभिनेत्री नेहा बरोबर लग्न केले.
सुष्मिता सेन आणि रोहमन शाल:- या यादीमध्ये आणखी एक नाव आले आहे जे म्हणजे माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सुष्मिता सेन जी आजकाल तिच्या अफेअरविषयी चर्चेत असते.
खरं तर सुष्मिता तिच्यापेक्षा 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या काश्मिरी मॉडेल रोहमनबरोबर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये रहात आहे. ती अजूनही अविवाहित आहेत. त्यांनी अद्याप लग्न केलेले नाही. तर तिने दोन मुली दत्तक घेतली आहेत.
२०१८ च्या नोव्हेंबरमध्ये सुष्मिता सेननं सोशल मीडिया अकाऊंट इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करत आपल्या बॉयफ्रेंडबद्दल सर्वांना सांगितलं होतं. सुष्मिता सेन सध्या मॉडल रोहमन शॉलला डेट करत आहे आणि सुष्मितानं फोटो पोस्ट करून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.
वयानं लहान असलेल्या सुष्मिताची ओळख रोहमनसोबत कशी झाली याबाबतच्या बऱ्याच चर्चा रंगल्या. आजपर्यंत असं मानलं जातं होतं की एका फॅशन शोमध्ये दोघं भेटले आणि तिथून दोघांची लवस्टोरी सुरू झाली. मात्र हे खरं नसल्याचं आता समजलं आहे. सुष्मितानं राजीव मसदंला दिलेल्या एका मुलाखतीत, माझी आणि रोहमनची लव स्टोरी कशी सुरू झाली याबाबत सांगितलं आहे.
रोहमननं मला इंस्टाग्रामवर एक डायरेक्ट मॅसेज पाठवला होता. मात्र इंस्टाग्रामवर आलेले मॅसेज मी कधीच वाचत नाही. त्यामुळे त्या सर्व मॅसेजमध्ये त्यानं पाठवलेला मॅसेजसुद्धा होता आणि ते मॅसेजच मी वाचलेले नव्हते. एक दिवस मुलीसोबत बोलत असताना रोहमनच्या मॅसेजवर अचानक क्लिक झालं. त्यानंतर रोहमननं पाठवलेला मॅसेज मला इतका आवडला की मी त्याला लगेचच रिप्लाय दिला, असं सुष्मितानं सांगितलं. तेव्हापासून आमच्या दोघांचं मॅसेजच सुरूच राहिले.