कहो ना प्यार है चित्रपटामधून सर्वांच्या मनावर राज करणारी अभिनेत्री अमिषा पटेलचे करियर खूपच कमी काळामध्ये बुडाले, ज्यानंतर ती नेहमी कोणत्याना कोणत्या आरोपामध्ये फसत गेली.
याच दरम्यान आता पुन्हा एकदा तिचे नाव एका मोठ्या केसमध्ये फसले आहे, ज्यासाठी तिचे अरेस्ट वारंट जारी झाले आहे. होय अमिषा पटेलला कोणत्याहि क्षणी अटक होऊ शकते, जिचा शोध रांची पोलीस करत आहे. इतकेच नाही तर यावेळी सुद्धा तिच्यावर फसवणूक केल्याचा आरोप लागला आहे, ज्यामुळे तिच्या समस्यांमध्ये आणखीन वाढ होऊ शकते.
जेव्हा पहिल्यांदा अमिषा पटेलला बॉलीवूडमध्ये पाहिले गेले होते, तेव्हा लोकांना असे वाटले होते कि ती फार काळ बॉलीवूडमध्ये राज करेल, परंतु तिचे नशिब पूर्णपणे पालटले आणि आज तिचे नाव देखील खूपच कमी लोकांना माहिती आहे.
इतकेच नाही तर आता तिच्याजवळ ना हि पैसा आहे ना हि रुबाब आहे. ज्यामुळे ती नेहमी अडचणीत अडकत चालली आहे आणि यावेळी हे प्रकरण खूप मोठे आहे. अमिषा पटेल आपल्या एका हास्याने त्यावेळी लोकांना वेड लावत होती, परंतु आज आपल्या ओळखीसाठी ती संघर्ष करत आहे.
जारी झाले अरेस्ट वारंट
बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल विरुद्ध कोर्टाने एक अटक वॉरंट जारी केले आहे ज्यानंतर तिला कधीहि अटक होऊ शकते. हे वारंट ९ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आले होते. परंतु अजूनपर्यंत पोलीस तिला हुडकण्यात यशस्वी झालेले नाही.
अशामध्ये आता असे म्हंटले जाते कि तिला लवकरच अटक केले जाऊ शकते. या प्रकरणामध्ये तिचा मित्र कुणालसुद्धा सामील आहे, त्याच्याविरुद्धसुद्धा अरेस्ट वारंट जारी करण्यात आले आहे, अशामध्ये दोघांनाही पोलीस कधीही अटक करू शकतात.
लागला आहे फसवणूकीचा आ रोप
अमिषा पटेल गेल्या काही वर्षांपासून उधार घेताना पाहायला मिळत आहे, परंतु उधार परत देण्याचे ती नावच घेत नाही, ज्यामुळे ती यावेळी कायदेशीर अडचणीत सापडली आहे. खरे तर अमिषा पटेलने अजयकडून चित्रपट बनवण्यासाठी पैसे घेतले होते, ज्यानंतर तिने पैसे परत देण्यास नकार दिला,
जेव्हा अजयने तिला पैसे मागण्यात जास्त जोर दिला तेव्हा तिने ३ करोडचा चेक दिला आणि तो चेक बाउंस झाला. यानंतर अजयने अमिषा पटेलसोबत बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने पैसे देण्यास साफ नकार दिला आणि त्यानंतर हे प्रकरण कोर्टामध्ये गेले.
पैसे घेतल्यानंतर देण्यास नकार देते अमिषा पटेल
अमिषा पटेलचे हे पहिले प्रकरण नाही जेव्हा तिच्यावर फसवणूक केल्याचा आरोप लागला असेल. याआधीहि तिच्यावर दुकानदारकडून पैसे घेऊन त्याच्या लग्नामध्ये डांस न करण्याचा आरोप लावला गेला होता.
ज्यानंतरच ती अनेक फसवणूकीच्या आरोपामध्ये फसत गेली. इतकेच नाही तर आपले आयुष्य सुधारण्यासाठी तीने असे अनेक गुन्हे करण्याची हिम्मत देखील केली आहे.