हिंदी चित्रपटसृष्टीत असेही काही कलाकार होते ज्यांनी मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली नसली तरी ख लनायक, कॉमेडी आणि सपोर्ट रोल करून लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले.
कादर खान त्यामधीलच एक अभिनेता आहेत. आपल्या फिल्मी करियरमध्ये त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये अभिनय केला.
आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले होते.
अशी कोणतीही भूमिका नाही कि जी कादर खान यानी केली नसेल. चाहते कादर खानला कॉमेडी आणि गंभीर भूमिकेमध्ये पाहणेच जास्त पसंद करत होते. फार कमी लोकांना माहित नाही कि कादर खान अभिनयाबरोबर उत्कृष्ठ संवाद लेखणसुद्धा करत असत.
एक संवाद लेखक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात केली होती. नुकताच २२ ऑक्टोबरला त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला.
याचे औचित्य साधून आम्ही तुम्हाला त्यांच्या जीवनातील अमिताभ बच्चनशी संबंधित एक रंजक किस्सा सांगणार आहोत. असे म्हंटले जाते कि अमिताभ बच्चनला एक सफल अभिनेता बनवण्यामध्ये कादर खानचा यांचा हाथ होता.
तर कादर खानचे करियर संपुष्टात येण्यात अमिताभ बच्चन कारणीभूत होते. काही वर्षापूर्वी कादर खान आपल्या पत्रकार मित्रांसोबत गप्पागोष्टी करत बसले होते.
त्यावेळी तिथे अमिताभ बच्चनचा उल्लेख झाला. अमिताभचे नाव ऐकून कादर खान एकदम गप्प झाले. त्यावेळी त्यांनी जे सांगितले ते ऐकून सर्वांनाच आ श्चर्याचा ध क्का बसला.
कादर खान म्हणाले कि, जर मी अमिताभजीना सर म्हणून संबोधले असते तर आज माझे करियर सं पुष्टात आले नसते” कादर खान असे का म्हणाले चला तर मग जाणून घेऊया.तर झाले असे कि,दक्षिण भारतातील एक निर्माता कादर खानला संवाद लेखक म्हणून घेणार होता.
पण त्यांना एक अट घालण्यात आली ती म्हणजे तुम्ही त्यांना सर म्हणावे लागेल…यावर कादर खान म्हणाले कि कोण सर? त्यावर निर्माता म्हणाले. तुम्ही अमिताभ सरांना ओळखत नाही! त्यावर कादर खान म्हणाले ते सर कधीपासून झाले?
त्यावेळी फिल्म इंडस्ट्रीमधील लोकांनी अमिताभ बच्चन यांना सर म्हणून हाक मारायला सुरवात केली होती. परंतु कादर खान यानी अमिताभ यांना सर म्हणायला साफ नकार दिला. मी माझ्या कुटुंबातील व्यक्तींना आणि मित्रांना कधी असे अदबीने बोलवत नाही.
फक्त ह्या कारणावरून कादर खानच्या हातातून एक चांगला चित्रपट निसटला. ह्या चित्रपटामध्ये कादर खान यांनी एक तर अभिनय केला असता किंवा संवाद लेखन केले असते.
परंतु त्यांना कोणतेही काम मिळाले नाही कारण त्यांनी अमिताभ यांना सर म्हणून संबोधले नाही.
या चित्रपटामध्ये गंगा जमुना, खुदा गवाह सारखे चित्रपटसुद्धा होते. यापूर्वी कादर खान यानी अमिताभ बच्चनच्या बऱ्याच चित्रपटामध्ये उत्कृष्ठ संवादलेखन केले होते. या कारणामुळे अमिताभ बच्चन एक सफल अभिनेता बनू शकले होते.
त्यानंतर झाले असे कि अमिताभ बच्चनच्या नावासमोर फक्त सर न लावल्यामुळे कादर खान यांच्या करियरला उतरती कळा लागली. कादर खान फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात उत्कृष्ठ संवाद लेखकांपैकी एक आहेत. त्यांनी फिल्म इंडस्ट्रीला त्यांचे बहुमुल्य योगदान दिले आहे.