सध्या बॉलिवूडमध्ये बऱ्याच सेलिब्रिटींचे फॅमिली प्लॅनिंग सुरू आहे. ज्यामध्ये अनुष्का शर्मा अमृता राव आणि करीना कपूर सारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे. करीना कपूरविषयी बोलले तर ती सध्या दुसऱ्यांदा ग-र्भवती आहे आणि अलीकडेच ती तिच्या आगामी चित्रपटाचे शू-टिंग पूर्ण करून घरी परतली.
आम्ही तुम्हाला सांगतो की करीना गेल्या 28 दिवसांपासून पती सैफ आणि मुलगा तैमूरसमवेत दिल्लीच्या पतौडी पॅलेसमध्ये होती आणि आता ती मुंबईत परतली आहे. बरं आज आम्ही या लेखात करीनाच्या आगामी चित्रपटाची नव्हे तर तिच्या आणि शाहिदच्या प्रेम प्रकरणातील काही न ऐकलेल्या गोष्टी सांगणार आहोत.
हे आपणास माहित आहे की शाहिद कपूर आणि करीना कपूर यांचे खूप वर्ष प्रेमसं-बंध होते. हे प्रेम दोघांच्या लग्नापर्यंत देखील पोहोचले होते. पण त्यांच्या प्रेमकथेचा शेवट खूप वाईट झाला. आम्ही तुम्हाला सांगतो की शाहिद-करीनाची प्रेमकथा इंडस्ट्रीमधील सर्वात प्रसिद्ध लव्ह स्टोरी होती.
या जोडीला ऑनस्क्रीन तसेच ऑफस्क्रीन पाहणे लोकांना खूप आवडायचे. असे म्हटले जाते की या दोघांची प्रेमकथा फिदा चित्रपटाच्या सेटवरुन सुरू झाली आणि 3 वर्षांनंतर 2007 साली जेव्हा जब वी मेट हा चित्रपट आला तेव्हा त्यांच्या नात्यात मोठे वादळ निर्माण झाले.
पण या दोघांच्या ब्रेकअपला आता 12 वर्षे उलटून गेली आहेत. परंतु या ब्रेकअपचे एक नवीन कारण समोर आले आहे. संपूर्ण घटना काय आहे ते आपण जाणून घेवूयात. करीना आणि शाहिदच्या ब्रेकअपचे हे खरे कारण आहे.
करीना बबिता आणि करिश्मा:- शाहिद आणि करीनाच्या ब्रेकअपची अनेक कारणे दिली गेली होती. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार दोघांचे ब्रेकअप होण्याचे कारण शाहिदचे दुसरीकडे प्रेमसं-बंध होते. तर काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला गेला आहे की करीना आणि शाहिदचे नाते करीनाच्या कुटूंबामुळे मोडले आहे.
होय करिनाची आई बबिता कपूर आणि करिनाची बहीण करिश्मा कपूर हे मोठे विरोधक होते. असे म्हटले जाते की बबिता आणि करिश्मा दोघांनाही शाहिद नको होता यांना शाहीदवर विश्वास नव्हता. त्याचबरोबर असा दावा देखील करण्यात आला होता की करिश्माला शाहिद आणि करीनाचे सं-बंध सुरुवातीपासूनच पसंत नव्हते.
ब्रेकअपसाठी शाहिदने अखेरचा फोन केला असा दावा केला जात असला तरी करीनाने त्या दिवसांत परत नॉर्मल होण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. या नात्याची सुरूवात 2004 साली झाली होती आणि त्या काळात मिडिया मध्ये त्यांच्या नात्याची बरीच चर्चा सुरु होती.
या दोघांनीही अनेक वेळा मिडियासमोर आपल्या नात्याची कबुली देताना पहिले गेले होते. दोघांनीही आपलं नातं व्यक्त करण्यास कधीही मागेपुढे पाहिले नाही. पण 2007 पर्यंत त्यांच्या नात्यात दुरावा आला. असे म्हटले जाते की 2006 मध्ये जब वी मेट या चित्रपटाचे शू-टिंग सुरू झाले तेव्हा दोघांचे नात चांगलेच चालले होते.
पण शू-टिंग संपताच नात्यात वादळ निर्माण झाले. या चित्रपटाशी सं-बंधित लोकांच्या म्हणण्यानुसार शू-टिंगच्या शेवटच्या काळात दोघांमधील संवाद कमी झाला आणि शेवटच्या सीनच्या शू-टिंगच्या वेळी दोघेही वेगवेगळ्या ठिकाणाहून आले. आम्ही सांगतो की दोघांनी 36 चायना टाऊन चूप चुपके आणि जब वी मेटमध्ये एकत्र काम केले आहे हे चित्रपट चांगले सुपरहि-ट ठरले होते.
शाहिद-करीनाच्या ब्रेकअप होण्यामागील एक कारण म्हणजे शाहिद आणि अमृता:- अभिनेत्री अमृता राव देखील शाहिद-करीनाच्या ब्रेकअपचे एक कारण असल्याचे मानले जाते. रिपोर्ट्सनुसार व्हिवा फिल्मच्या शू-टिंगच्या वेळी अमृता आणि शाहिदची जवळीक चांगलीच वाढली होती.
यामुळे करीनाचा पारा चढत होता. यामुळे करीना आणि शाहिदमध्ये बरेच भांडण झाले होते. अखेर दोघांचेही ब्रेकअप झाले. यानंतर सैफबरोबर करीनाची जवळीक वाढली आणि दोघांनी 2012 मध्ये लग्न केले. दुसरीकडे शाहिद कपूरनेही सगळे विसरून 2015 मध्ये मीरा राजपूतशी लग्न केले.