सेलेब्रिटी झाल्यानंतर पण ह्या कलाकारांना नाही आला थोडाही घमंड, जुन्याच प्रेमींसोबत लग्न करून बनले उत्तम उदाहरण …

Bollywood Entertenment

असे म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती यशाची उंची गाठतो तेव्हा त्याचे पाय नेहमी जमिनीवरच राहिले पाहिजेत. कारण बर्‍याचदा असे दिसून येते की एकदा यशस्वी झाल्यावर एखादी व्यक्ती या टप्प्यावर पोहोचण्यासाठी आलेल्या समस्यांस विसरते. कुणीतरी हे अगदी बरोबर सांगितले आहे की माणसाने आपला वाईट दिवसांना कधीही विसरू नये.

कारण जर त्याला आठवत असेल की त्याने कोण कोणत्या परिस्थितीतून हे संकट पार केले आहे तरच तो नेहमी जमिनीशी जोडलेला राहील आणि दुसर्‍या कोणाशीही गैरवर्त न करणार नाही. मा दक पदार्थांचे व्य सन सर्वात वाईट सवय आहे. हे चांगल्या चांगल्या लोकांचे मन खराब करते. परंतु जो माणूस खरोखर यशस्वी होतो तो यशस्वी असूनही भूमीशी जोडलेला असतो आणि आपल्या आयुष्यात उपस्थित लोकांचा नेहमी आदर करतो.

यश म्हणजे अशी व्यक्ती ज्याला नातेसं बंधांचे महत्त्व माहित असते आणि ज्याचे मन कोणत्याही मा दक पदार्थांना हाथ लावत नाही. आजच्या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला ग्लॅमर इंडस्ट्रीशी सं-बंधित काही अशा कलाकारांबद्दल सांगणार आहोत जे प्रसिद्ध आणि यशस्वी असूनही त्यांचे जुने प्रेम विसरले नाहीत आणि आपल्या जुन्या पार्टनर बरोबरच लग्न केले.

१. किंशुक आणि दिव्या महाजन:- किंशुक हा छोट्या पडद्यावरील एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. शाळेच्या दिवसांमध्ये त्याने दिव्या नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. पण त्याला अभिनयासाठी मुंबईला यावं लागलं. येथे येऊन काम मिळवून त्याने विदाई आणि सपना बाबुल का यासारख्या मालिकांमध्ये काम करून तो स्टार बनला. लोक त्याला घरोघरी ओळखू लागले. प्रसिद्ध असूनही त्याने थोडा सुद्धा अभिमान बाळगला नाही आणि त्याने बालपणातील मैत्रीण दिव्याशी लग्न केले.

२. मनीष आणि संयुक्ता पॉल:- मनीष पॉल सुप्रसिद्ध छोट्या पडद्यावरील अभिनेता आहे. आजकाल आपण त्याला इंडियन आयडॉलमध्ये अँकर म्हणून आपणास बघयला मिळतो. मनीषने बॉलिवूडमध्येही डेब्यू केला आहे. जेव्हा जेव्हा विनोदी कलाकारांचा विचार केला जातो तेव्हा मनीषचे नाव शीर्षस्थानी येते. आम्ही तुम्हाला सांगतो की मनीष पॉलचेही त्याच्या बालपणातील प्रेम संयुक्ताशी लग्न झाले आहे.

मनीषला इंडस्ट्रीत आता वेगळ्या परिचयाची गरज उरलेली नाही. त्याने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत भरपूर यश मिळवले. सिनेमांसाठी मात्र त्याला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे.

मनीष पॉल सांगतो मी आणि संयुक्ता शाळेत असल्यापासून एकमेकांना ओळखतो. तेव्हापासून तिने नेहमीच मला साथ दिली आहे. माझा गृहपाठ करण्यापासून ते माझ्या असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी देखील ती मदत करायची. 2007 मध्ये आम्ही विवाहबद्ध झालो आणि 2008 हे वर्ष माझ्यासाठी खूप खडतर होते कारण आमची उपजीविका चालवण्यासाठी माझ्या हातात काहीही काम नव्हते. ते संपूर्ण वर्ष तिने काम करून घर चालवले आणि मला मात्र तिने माझ्या स्वप्नांचा पाठलाग करायला सांगितले. ती माझ्यासाठी हीरो आहे.

३. रोहित आणि नेहा खुराना:- वर्ष 2009 मध्ये रोहितने टीव्हीचा सर्वात प्रसिद्ध शो उतरण या मालिकेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. काही दिवसातच तो एक प्रसिद्ध स्टार बनला आणि त्याची फॅन फॉलोईंगही कमालीची वाढली. पण यशाचा नशा त्याच्यावर अजिबात आला नाही आणि त्याने त्याचे बालपणाची मैत्रीण नेहाशी लग्न केले. आज दोघेही सुखी आयुष्य जगत आहेत.

४. करणवीर आणि देविका मेहरा:- करणवीर हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने परी हूं मैं आणि पवित्र रिश्ता सारख्या सुपरहिट मालिकांमध्ये काम केले आहे. एकेकाळी बऱ्याच मुली त्याच्या प्रेमात होत्या. पण त्याने आपल्या बालपणातील प्रेमिका देविकाशी लग्न करून बाकी सर्व मुलींचे हृदय मोडले. २०१४ मधील रागिनी एमएमएस 2 चित्रपटात करणवीर देखील दिसला होता.