हे आहेत बॉलीवुडचे 6 सर्वात आवडते कपल्स, ज्यांनी साखरपुडा केला परंतु लग्न नाही करू शकले …

Bollywood

बर्‍याचदा चित्रपटांमध्ये दोन प्रेमींना पाहिल्यावर असा विचार येतो की वास्तविक जीवनातही हे दोघे एकत्र असते तर काय झाले असते. मात्र बर्‍याच वेळा रील लाइफमधील कपल देखील वास्तविक आयुष्यामध्ये कपल बनतात आणि नंतर डे टिंगनंतर साखरपुडापर्यंत पोहोचतात.

परंतु नंतर त्यांच्यात हळूहळू वा द निर्माण होण्यास सुरवात होते मग ते एकमेकांसाठी परफेक्ट राहत नाहीत म्हणून ते असलेले पुढे वेगळे होतात आणि आपल्या आपल्या आयुष्यात पुढे जातात. आज आम्ही तुम्हाला ६ सर्वात आवडत्या कपलविषयी सांगणार आहोत ज्या बॉलिवूड स्टार्सचे प्रेम साखरपुडापर्यंत पोहोचले परंतु त्यांचे लग्न झाले नाही.

१. करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन:- २००२ साली अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर एकमेकांना डे ट करत होते त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगाच्या निमित्ताने या दोघांचा साखरपुडा केला आणि हा क्षण आणखी संस्मरणीय बनवला.

मात्र पुढच्या वर्षी त्यांचा साखरपुडा मोडला. त्यानंतर मिडिया मध्येत्यांचे  ब्रे कअप झाल्याची बातमी आ गीसारखी पसरली. अखेर त्यांचे नाते का मो डले गेले हे कोणालाही कळू शकलेले नाही.

२.रवीना टंडन आणि अक्षय कुमार:- मोहरा चित्रपटात एकत्र काम केलेले रवीना टंडन आणि अक्षय कुमार हे खऱ्या आयुष्यात देखील एकमेकांवर प्रेम करत होते . बातमीनुसार या कपलने मंदिरात साखरपुडा केला होता. रवीनाने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की अक्षय त्या काळात बर्‍याच चित्रपटांमध्ये काम करत होता.

अशा परिस्थितीत त्याला भीती होती की साखरपुडाची गोष्ट बाहेर कळल्यानंतर त्याचे फॅन फॉलोव्हर्स कमी होतील . म्हणून त्याने हे नाते लपून ठेवले. पण चित्रपट खिलाडियो का खिलाडी येवू पर्यंत त्यांच्या नात्यात फूट पडली आणि शेवटी ते दोघे एकमेकांपासून वेगळे झाले.

३.संगीता बिजलानी आणि सलमान खान:- बॉलिवूडचा द बंग खान उर्फ ​​सलमान खानच्या अफेअर्सची यादी बरीच लांबलचक आहे. पण अशी एक अभिनेत्री देखील आहे जीच्याशी त्याचे नाते अगदी साखरपुडापर्यंत पोहोचले होते. ती दुसरे कोणी नाही तर संगीत बिजलानी होती तीने तर साखरपुडानंतर सलमानसोबत लग्नाचे स्वप्ने सजवले होते.

जरी लग्नाची तारीख निश्चित झाली होती आणि कार्ड्स देखील छापले गेले होते परंतु नंतर अचानक दोघांनी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. त्यांचे लग्न मोडण्याचे कारण अजून कळलेले नाही.

४.गौहर खान आणि साजिद खान:- २००३ साली गौहर खान आणि साजिद खान एकमेकांना डे ट करत होते आणि त्या दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. पण त्यानंतरही दोघांमध्ये काही गैर समज निर्माण झाले त्यांचे लग्न मोडले. याबद्दल एका मुलाखतीदरम्यान साजिदने सांगितले होते की त्याने साखरपुडा केला होता पण आम्ही नंतर वेगळे झालो.

५.गुरप्रीत गिल आणि विवेक ओबेरॉय:- चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी विवेक ओबेरॉयचा मॉ डेल गुरप्रीत गिलबरोबर साखरपुडा झाला होता. पण नंतर तो शू*टिंगमध्ये इतका बिझी झाला की या दोघांच्या नात्यामध्ये फू ट पडली आणि अखेर त्यांचे नाते तुटले.

याविषयी जेव्हा गुरप्रीत गिल यांना विचारले गेले तेव्हा तिने सांगितले की लग्नासाठी ती कधीही आपल्या तत्वामध्ये त डजोड करू शकत नाही म्हणूनच तिने विवेकला सोडून देण्यास सांगितले होते.

६.बरखा बिष्ट आणि करणसिंग ग्रोव्हर:- दिल मिल गया या मालिकेतून प्रसिद्धी मिळवणाऱ्या करणसिंग ग्रोव्हरने बर्खा बिष्टशी पहिल्यांदा साखरपुडा केला होता. दोघांनीही त्यांच्या शोच्या शू*टिंगदरम्यान एकमेकांना मनापासून प्रेम करत असल्याचे सांगितले होते. २००४ साली त्यांचा साखरपुडा झाला होता पण दोन वर्षानंतर काही कारणांमुळे त्या दोघांचे नाते तु टले.