मनिषा कोईराला हे नाव ऐकलं की सर्वांसमोर एका मनमोहक, सालस अभिनेत्रीचा चेहरा उभा राहतो. मनिषा ही एक अशी अभिनेत्री होती जिने आपल्या आवाजातील खुबी नी अभिनयाच्या जोरावर रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. मनिषाने जितकेही सिनेमे केले तेवढ्या सिनेमांना रसिकांनी भरभरून प्रेम दिलं असचं म्हणावं लागेलं.
केवळ दाक्षिणात्य नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही तिने आपलं वर्चस्व गाजवलं. आज आपण याच खास अशा असलेल्या अभिनेत्रीबाबत एका फारच धक्कादायक बाबीचा उलगडा करणार आहोत. नव्वदीच्या दशकातल्या या अभिनेत्रीने आपल्या महमोहक अदा व सौंदर्याच्या जोरावरही अनेकांना आपल्या प्रेमात पाडल्याचं पहायला मिळतं.
आजवर अनेकदा आपल्या खाजगी आयुष्याला घेऊन दाक्षिणात्य सिनेसृष्टी व प्रसारमाध्यमांमधे ती फार प्रचलीत राहिल्याची पहायला मिळाली आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की तब्बल एक, दोन अथवा तीन चार नाही तर बारा पुरूषांसोबतचे तिचे प्रेमाचे किस्से असलेले समोर आले आहेत. २०१० सालात अखेर तिचं लग्न झालं परंतु दुर्दैवाने हे लग्न केवळ दोन वर्षांपेक्षा अधिक टिकू शकलं नाही. वयाच्या आज पन्नाशी नंतरही मनिषा एकूण पाहता एकटीच असल्याची पहायला मिळते.
तुम्हाला आता याचं आश्चर्य वाटेल की एकूण बारा व्यक्ती कोण होते? ज्यांच्याशी तिच्या अफेयर्सच्या बाबी रंगल्या होत्या. चला तर मग आपण त्या व्यक्तींवर एक नजर टाकूयात. तर प्रथम नाव हे विवेक मुशरान हे आहे. प्रसिद्ध निर्माते सुभाष घई यांच्या सौदागर या सिनेमात विवेक व मनिषा हे दोघे पहायला मिळाले होते. याच दरम्यान दोघांना अनेकदा सोबत पाहिलं गेलं होतं. त्यांच नात खुलू लागल्याची चर्चा येत असताच या नात्याचा शेवट फार लवकर झाला.
यानंतर ज्या नावाचा उल्लेख करायचा ते नाव म्हणजे, नाना पाटेकर. नाना पाटेकर हिंदी सिनेमात अनेकदा काम केलेले अभिनेते आहेत. त्यांना अनेकदा मनिषाच्या घरातून रात्री अपरात्री उशीरा परतताना अनेकदा पाहिल्या गेलं होतं. नाना पाटेकरांनी एकदा या नात्याचा खुलासा स्वत:च केला होता परंतु मनिषाकडून आपल्याला दगा मिळाला म्हणत त्यांनी हे नात संपवलं होतं.
यानंतरचं एक नाव म्हणजे डीजे हुसैन. नाना पाटेकरांनतर डीजेसोबतच्या मनिषाच्या प्रेमाच्या चर्चांना उधाण आलं होतंं. डीजे हुसैन यांनी मनिषाला प्रपोजही केलं होतं. परंतु काही कारणे देत मनिषाने हे नातही स्विकारलं नाही आणि ब्रेक-अप करत ती यातून बाहेर पडली. यापुढे मनिषाचं प्रेम हे सेसिल एंथनी हे होते. लं-डन या शहरातील हे एक मोठे उद्योगपती होते. त्यांच्या व मनिषामधे फारच जवळीकता निर्माण झाल्याची स्पष्टपणे पहायला मिळतं होती.
परंतु पुढे काही कारणास्तव हे नातंही लवकरच संपून गेलं. यापुढील नाव म्हणजे, आर्यन वेद. खरतरं मनिषाच्या आयुष्यातलं हे एकूण पाचवं प्रेमप्रकरण होतं. तिच्या आयुष्यात जितके लवकर तिचे अफेयर्स संपून जायचे तितकेच लवकर ते सुरूदेखील व्हायचे. अभिनेता आर्यन वेद याचा विचार तिच्याशी लग्न करून स्थिरावण्याचा होता परंतु असं झालं नाही. मनिषा पुन्हा नव्या आयुष्यात वळली होती. यानंतर मनिषा लग्नाबाबत गंभीर झाल्याची पहायला मिळाली होती.
पहिल्यांदाच ती इतकी गंभिर झाली होती. आणि समोरची व्यक्ती होती प्रशांत चौधरी. परंतु दुर्दैवाने प्रशांतच्या कुटूंबियांनी या लग्नाला विरोध दर्शविला आणि हे नातं तुटलं. मनिषाच्या बाबतीत तिच्या प्रेमाच्या नात्यांची गोष्ट केवळ एवढ्यावरच थांबली असं झालं नाही. क्रिस्पिन क्रायरोन हे नेपाळ इथे असलेले ऑस्ट्रेलियन राजदूत यांच्याशीही तिचे नाते जडले गेले. दोघांच नातं सुरळीत चाललं परंतु शेवटी क्रिस्पिन यानेच मनिषाला लग्नासाठी नकार दिला आणि नातं संपवण्यात आलं.
यानंतर तारिक प्रेमजी हे नावाजलेलं नाव मनिषाच्या नात्यात जोडल्या गेलं. जगप्रसिद्ध व्यापारी अजीज प्रेमजी यांच्या मुलाचं हे नाव. दोघांच अफेयर सरतेशेवटी संपुष्टात आलं. यानंतर येणार नाव म्हणजे, राजीव मूलचंदानी. काही काळ एक चांगले मॉडेल राहिलेले राजीव यांनीही मनिषाशी नाते जोडले. राजीवने खुलासाही केला की, मनिषाकरता त्याने त्याची गर्लफ्रेंड ऐश्वर्यालाही सोडलं होतं. यानंतर मनिषा व म्युझिक कंपोजर संदीप चौटा यांचीही प्रेमकहाणी फुलली होती.
परंतु संदीप या नात्याला हलक्यात घेत असल्याने मनिषाने त्याच्याशी ब्रेक-अप केला. यानंतर क्रिस्टोफर डोरीस हे नाव मनिषाच्या आयुष्यातं आलं. तब्बल तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी वेगळ होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नेपाळी व्यावसायिक सम्राट दहल याच्याशी २०१० सालात मनिषाने विवाह केला. २०१२ पर्यंत हे नातं टिकू शकलं आणि नंतर घटस्फो-ट झाला. दुर्दैवाने आज मनिषाच्या आयुष्यात एकही व्यक्ती टिकू शकला नाही असं पहायला मिळतं आहे.
मित्रांनो, मनिषा कोईरालाच्या या साऱ्या गोष्टींबाबत तुम्हाला काय वाटतं? मनिषाने आयुष्याच्या एका वळणावर एक ठाम निर्णय घेतला असता तर ती आज व्यवस्थित वैवाहिक जीवन जगू शकली असती का? मनिषाच्या आयुष्यात आज कुणी नाही तेव्हा एकटं असणं ही उणीव तिला भासत असेल का? विविध नात्यांसं-बंधी आपलं काय मत आहे? आपली उत्तरे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. धन्यवाद!