टीम इंडियामध्ये काही क्रिकेटपटू असे आहेत ज्यांनी आधीच विवाहित असलेल्या स्त्रियांवर प्रेम केले , काहींचे घटस्फो ट झाले होते तर काहींचे वैवाहिक जीवन अद्याप सुरू होते . प्रेमात पडल्यावर त्यांनी कोणाची पर्व न करता एकमेकांची साथ डिली आणि लग्न केले. चला तर मग आज पाहूया असे कोणते खेळाडू आहेत ज्यांनी विवाहित महिलांवर प्रेम केले.
क्रिकेट आणि बॉलीवूड यांचे घनिष्ठ सं बंध आहेत. बॉलीवूडमध्ये जे घडते तेच क्रिकेटपटूंच्या आयुष्यामध्येही घडते. सामान्य माणूस आधीपासून विवाहित असलेल्या महिलेशी लग्न करण्याचा विचारच करू शकत नाही. पण भारतातील या दिग्गज खेळाडूंनी मात्र विवाहित महिलांशी लग्न करणे पसंत केले.
शिखर धवन:- सलामीवीर म्हणून ज्याला ओळखतात त्या शिखर धवनने ऑस्ट्रेलियन बॉक्सर आयशा हिच्याशी लग्न केले आहे. तिचा आधीच घटस्फो ट झाला होता आणि ती दोन मुलींची आईही होती. त्या दोघांत १० वर्षांचे अंतर आहे. त्या दोघांना जोरावर नावाचा मुलगा आहे आणि आयशाच्या दोन्ही मुलीसुद्धा शिखर धवन याच्याबरोबर राहतात.
मुरली विजय:- दिनेश कार्तिकच्या पत्नीचे आणि मुरली विजय याचे प्रेमप्रकरण होते. ते उघडकीस आल्यावर दिनेश कार्तिकने निकिताला घ-टस्फो ट दिला त्यानंतर मुरली विजयने तिच्याशी विवाह केला.
मोहम्मद शमी:- मोहम्मद शमी याने हसीन जहा हिच्याशी २०१४ मध्ये विवाह केला होता. हसीन एका मुलीची आई असून तिचा आधीच घटस्फो-ट झाला होता. घट स्फोटाची बाब लपवून ठेवल्याने त्या दोघांच्या सं बंधात दुरावा निर्माण झाला. ह्याचा खटला कोर्टात चालू असून हे दोघे वेगळे राहात आहेत.
व्यंकटेश प्रसाद:- वेगवान वेंकटेश प्रसाद याने १९९६ साली जयंतीशी लग्न केले. जयंती आणि व्यंकटेश यांची भेट क्रिकेटर मित्र अनिल कुंबळे यांच्यामुळे झाली होती.
अनिल कुंबळे:- अनिल कुंबळे यांची प्रेमकहाणी मोठीच रंजक आहे. एका ट्रॅव्हल कंपनीमध्ये त्याची एक महिलेशी ओळख झाली. तेव्हा तिचे आधीच लग्न झाले होते. तिला एक मुलगीही होती. हा खेळाडू भारताच्या सुवर्णयुगाचा साक्षीदार आहे. अनेक वर्ष तो भारताचा कर्णधा र तसेच प्रशिक्षक होता. चेतना नावाच्या महिलेशी त्याने विवाह केला.
चेतनाचे लग्न आधीच एका व्यावसायिकाशी झाले होते. तिला एक मुलगी होती आणि ती मुलीबरोबर वेगळी राहात होती. कुंबळेशी प्रेमप्र करण झाल्यानंतर पहिल्या पतीशी घटस्फो ट घेऊन ती कुंबळेबरोबर 1 जुलै 1999 या दिवशी विवाहबद्ध झाली.