रणबीर कपूर सोबत ब्रेकअपच्या नंतर अतिशय वाईट झाली होती कैटरीना कैफची हालत, म्हणाली त्या रात्री …

Bollywood

सध्या देशभरात अजून लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे सध्या सामान्य लोकांपासून ते मोठ मोठे स्टार्ससुद्धा सोशल मीडियावर बराच वेळ घालवत आहेत. फिल्म स्टार्सच्या अनेक गोष्टी सध्या सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहेत.

अशीच एक गोष्ट आहे ती म्हणजे रणबीर कपूर आणि कतरिना कैफबद्दलची. रणबीर बरोबरच्या झालेल्या ब्रेकअपनंतर दोन वर्षानंतर स्वत: कतरिनाने रणबीरबद्दल बर्‍याच गोष्टी उघड केल्या आहेत ज्या गोष्टी सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

बॉलिवूडमधली सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ आणि मुलींचा लाडका स्टार रणबीर कपूर यांचे नाते हे बॉलिवूडमधील एक चर्चेचा विषय होता. त्यांचे जवळपास सहा वर्ष टिकले होते. २०१७ मध्ये त्यांच्या ब्रेकअपमुळे बॉलीवूडपासून सर्व त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता.

अशाप्रकारे त्यांचे रिलेशन सुरू झाले:- रणबीर आणि कतरिनाच्या रिलेशनची सुरूवात ही २००८ मध्ये आलेल्या अजब प्रेम की गजब कहाणी या चित्रपटापासून सुरु झाली आंनी या दोघांचा २०१७ मध्ये ब्रेकअप झाला. जरी ब्रेकअप तिच्यासाठी एक चांगले वळण ठरले असे कतरिनाने तिच्या बोलण्यात म्हंटले होतते पण सत्य काहीतरी वेगळेच आहे चला जाणून घेवूया.

एका फॅशन साईटशी बोलताना कतरिनाने ब्रेकअपबद्दल सांगितले की आता मी हे एक आशीर्वाद म्हणून घेते कारण यांनंतर मी माझे काम आणि विचार प्रक्रिया अधिक चांगल्याप्रकारे करण्यास मी सक्षम झाली आहे. म्हणून मी या गोष्टीस एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहू लागले आहे.

13-13 तास मी झोपत राहत असे:- वर्ष २०१७ मध्ये रणबीरपासून ब्रेकअप झाल्यानंतर कतरिनाने ती १३ -१३ तास झोपत राहत असल्याचे सांगितले आहे. जरी कतरिनाने स्वत: झोपेचे नाव दिले असले तरी लोकांनी त्यास नैराश्य असे म्हटले आहे.

याबद्दल तुम्हाला माहिती असेलच की २०१७ मध्ये ब्रेकअपच्या एक वर्षापूर्वी कतरिना म्हणाली होती की माझे टाइम टेबेल इतके व्यस्त बनवले आहे की मी खूप कमी झोप घेते तिची फिटनेस ट्रेनर यास्मीन कराचीवाला तिला बर्‍याच वेळा दुपारी २ वाजता प्रशिक्षण देण्यासाठी तिच्या घरी येते त्यानंतर कतरिनाने सांगितले की ती एक वेळ झोप सोडू शकते परंतु फिटनेस चे वेळापत्रक कधीच मोडत नाही.

पुढे जाण्यासाठी थोडे थांबून विश्रांती घेणे आवश्यक आहे:- या मुलाखतीत कतरिना कैफ पुढे म्हणाली की आयुष्यात पुढे जाण्यासाठी विश्रांती घेणे फार आवश्यक आहे. हे नाते संपवण्याची जबाबदारी मी स्वतः घेते पण मला अशी समस्या आली ज्यासाठी मी जबाबदार नव्हते पण माझ्या आईने मला सांगितले होते की बर्‍याच मुली या समस्येबरोबर संघर्ष करत असतात पण त्या कधी खचत नाही तू देखील खचून जावू नको. प्रत्येक मुलगी या टप्प्यातून जात असते या गोष्टीचा माझ्यावर खोल परिणाम झाला आहे.

दीपिकाने भेट घडवून आणली होती:- पण आपणास हे माहित आहे का की दीपिका पादुकोणनेच कतरिनाला रणबीर कपूरबरोबर भेट घडवून आणली होती त्यावेळी कतरिना-दीपिकाची चांगली मैत्री असे. त्याचवेळी रणबीर दीपिकाला डेट करत होता नंतर रणबीरने दीपिकाला धोका देण्यास सुरुवात केली आणि कतरिनाला वेळ देण्यास सुरवात केली. याच कारणामुळे दीपिका आणि कतरीना बरेच वर्ष एकमेकांशी बोलत नव्हत्या.

यामुळे 21 कोटींचे झाले नुकसान:- कतरिनापासून वेगळे झाल्यानंतर रणबीर कपूरला 21 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार रणबीर कतरिना हे कार्टर रोडवरील सिल्व्हर सँड अपार्टमेंट्सच्या एका घरामध्ये राहत होते यासाठी रणबीरने 21 कोटी रुपयांची ठेव दिली होती. लीज संपण्यापूर्वीच घर सोडल्यामुळे हे पैसे बुडाले. या घराचे भाडे महिन्याला 15 लाख रुपये होते दोघेही या घरात जवळजवळ ८ महिने राहिले आहेत.