बॉलीवूडमधील अभिनेत्रींची अनेक रीलेशन्स आणि त्यांचे ब्रेकडाऊन झाल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो, टीव्हीवर देखील पहातो. चित्रपटात एकमेकांबरोबर काम करत असताना असे अनेक कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत.
पण नंतर काही कालावधीनंतर झालेला त्यांचा ब्रेकअपही खूप त्रासदायक होता. त्यातील काही जोड्या अशा पण आहेत की ज्यांनी त्यांच्या ब्रेकअपनंतर त्या कलाकाराबरोबर सिनेमात परत कधीही एकत्र काम केले नाही.
१. अक्षय कुमार व शिल्पा शेट्टी:- एकेकाळी दोघांच्याही प्रेमसंबंधांचि चर्चा खूप झाली. त्यानंतर, त्यांच्या लग्नाच्या बातम्याही आल्या व ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याची बातमी आली. पण दरम्यानच्या काळात अक्षय कुमारचे प्रेमप्रकरण ट्विंकल खन्नाबरोबर सुरू झाले आणि त्याने शिल्पाशी ब्रेकअप केले.
ब्रेकअपनंतर मात्र दोघांनी एकाही चित्रपटात जोडीने काम केले नाही. शिल्पाने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, अक्षयने तिचा वापर केला आणि मग तिला सोडून निघून गेला. शिल्पा म्हणाली होती की माझ्या आयुष्यातील तो अतिशय वाईट टप्पा होता. पण मी आता सावरले आहे, मला आता आनंद आहे, की मी या सगळ्यावर मात केली आहे.
जीवनाचा हा नियम आहे, की रात्री नंतर दिवस नक्की येतो. मी व्यवसायाने प्रगति केली होती, पण माझ्या वैयक्तिक आयुष्यात मला बरेच चढउतार बघायला मिळाले. मी आता सर्व मागे सोडून पुढे आले आहे. अक्षयसोबतच्या प्रेम प्रकरणांनंतर आणि त्याने केलेल्या फसवणूकीतून बाहेर आल्यानंतर शिल्पाने लग्न करण्याचा निर्णय घेतला व उद्योगपती राज कुंद्राशी लग्न केले. सध्या शिल्पा आपल्या कुटुंबासमवेत चांगला वेळ व्यतीत करीत आहे.
२. सलमान खान व ऐश्वर्या राय:- सलमान आणि ऐश्वर्या यांची प्रेमकहाणी सर्वश्रुत आहे. पण त्यांच्या प्रेमकहाणीचा अंत मात्र खूप वेदनादायक होता. त्यांच्या ब्रेकअपनंतर मात्र ते दोघेही कोणत्याही सिनेमात पुन्हा एकत्र दिसले नाहीत. त्यांचे प्रेम प्रकरण १९९९ मध्ये “हम दिल दे चुके सनम” या चित्रपटापासून सुरु झाले आणि साधारण २००१ पर्यंत दोघे एकमेकाच्या प्रेमात होते. पण सलमानच्या विचित्र वागण्यामुळे दोघांचे ब्रेकअप झाले.
३. शाहिद कपूर आणि प्रियंका चोप्रा:- यांचे प्रेम प्रकरण “कमीने” या चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवरुन सुरू झाले. दोघांनी या गोष्टीला नकार दिला. पण त्यांच्या ब्रेकअपनंतर दोघांनी एकही फिल्ममध्ये एकत्र काम केले नाही.
४. जॉन अब्राहम व बिपाशा बासू:- ह्या दोघांचे प्रेमसंबंध जवळपास ९ वर्ष होते. पण अचानक ते एकमेकांपासून दूर झाले. दोघांचे अचानक ब्रेकअप झाले. पण त्यानंतर ते दोघेही कोणत्याही सिनेमात एकत्र आले नाहीत.
जॉन अब्राहम याने २०१४ मध्ये नवीन वर्षावर एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्याने सर्व चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत लिहिले होते की, यावर्षी तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप प्रेम आणि आनंद येवो. लव्ह फ्रॉम जॉन आणि प्रिया अब्राहम. खरे तर त्याने हे ट्विट चुकून केले. आणि त्यात त्याने त्याची एन.आर.आय गर्लफ्रेंड प्रिया रांचलचे नाव लिहिले होते.
जॉनचे हे ट्विट वाचून बिपाशाला हे कळले की जॉन प्रियालाही डेट करत आहे. तिने ओळखले की जॉन तिची फसवणूक करीत आहे. त्यानंतर मात्र तिने त्याच्याशी असलेले रे\ब्रेकअप केले. एका मुलाखतीत बिपाशाने म्हटले होते की मला या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी बरेच महिने लागले.
माझं आणि जॉनचं नातं तुटलंय यावर विश्वास ठेवणं मला कठीण होतं. बिपाशा म्हणाली होती की मी जॉनमुळे लोकांना भेटणे सोडले. मी माझा सर्व वेळ फक्त जॉनला देत असे. तिने त्या काळात चित्रपट करणेही बंद केले होते.