वैदिक संस्कृतीनुसार हे सोळा संस्कार जीवनातील सर्वात महत्त्वाचे संस्कार मानले जातात. विवाह सोहळा त्यापैकी एक आहे ज्याशिवाय मानवी जीवन पूर्ण होऊ शकत नाही. हिंदू ध-र्मात विवाह सोहळा हा एक सोळा संस्कारांपैकी मानला जातो. परंतु येथे झालेला लग्न सोहळा पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. तर चला जाणून घेऊया नक्की काय आहे हा प्रकार.
लग्न समारंभात फेराचा सोहळा खूप महत्वाचा मानला जातो. हिंदू रिती-रिवाजांमध्ये लग्नाच्या वेळी वधू आणी वर हे दोघे ७ फेरे एकत्र मा र त असतात.
परंतू मुजफ्फरनगरमध्ये लग्नात असा गोंधळ उडाला आहे की चौथ्या फेरीनंतर वधू परत आलीच नाही. वर आणि त्यांच्या नातेवाईकांनी वधूची बऱ्याच वेळ वाट पहिली पण वधू परत आलीच नाही. पण जेव्हा या मागचे सत्य समोर आले तेव्हा त्या सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली.
वास्तविक मुजफ्फरनगर येथील मोहम्मदपूर गुमी येथील रहिवासी असलेल्या देवेंद्रने एक लाख रुपये देऊन आपले लग्न एका युवतीसोबत ठरवले होते. यांचे लग्न मोदीनगर येथील रहिवासी प्रदीप नावाच्या व्यक्तीने जोडले होते.
प्रदीपने या लग्नाचा प्रस्ताव आणला होता. त्याने असे सांगितले की असे एक कुटुंब आहे ज्याला आपल्या मुलीचे लग्न लावायचे आहे. मात्र या लग्नाच्या बदल्यात ते एक लाख रुपये मागत आहेत.
प्रदीपचे म्हणणे ऐकल्यानंतर देवेंद्रने लग्नाला होकार दिला. त्याच्याजवळ व्हॉट्सअॅपवर त्या मुलीचा फोटोही होता. मुलग्याचा फोटो पाहून मुलीने पहिल्या नजरेतच लग्नासाठी होकार दिला होता.
हे लग्न परतापूरच्या भूड़बराल गावात करायचे ठरले होते. रविवारी दुपारी देवेंद्र व त्याचे चार नातेवाईक लग्नासाठी भूड़बराल गावातल्या एका मंदिरात गेले.
मोहिउद्दीनपूर बागेजवळील या मंदिरात लग्नाचे विधी सुरू झाले. मुलीच्या बाजूने तीन लोक आले होते. देवेंद्रने लग्नासाठी आणलेली दागिने मुलीला घालायला दिले. यानंतर चार फेऱ्या झाल्या. मुलीच्या नातेवाईकांनी वराकडे अगोदर ठरल्याप्रमाणे एक लाख रुपये मागितले. यानंतर बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने ती मुलगी कुठेतरी निघून गेली.
खूप उशीर झाला पण वधू काय परत आली नाही तेव्हा तिला शोधण्याच्या बहाण्याने तिची मावशी आणि दुसरे काही लोक तिथून निघून गेले. इतकेच नाही तर सर्वांना शोधण्याच्या बहाण्याने लग्न लावणारा पंडितही तेथून निघून गेला. आता वराच्या बाजूची सर्व दागिने आणि एक लाख रुपयांची रक्कम मुलीच्या नातेवाईकांकडे होती.
पण वधू परत येण्याची काही खात्री वाटत नव्हती. बराच वेळ वाट पहिल्यानंतर वराचे डोके सनकले. त्याच्या लक्षात आले की इथे आपली फसवणूक झाली आहे.
अशा परिस्थितीत वर आणि त्याच्या कुटुंबियांनी परतापूर येथील पो-लिस ठाणे गाठले आणि तेथे त क्रार नोंद केली. त्याने पो-लिसांना वधूचा फोटो देखील दाखविला. परतापूर येथील निरीक्षक नजीर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार वराने दिलेल्या मोबाइल क्रमांकाच्या आधारे तपास केला जात आहे. पो-लिसांना तपासानंतर लवकरच आ-रोपी सापडेल.