कियारा अडवाणीने केला खुलासा – मध्यरात्री एक अभिनेता करत होता मला ह्यासाठी फोन..

Entertenment

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या आपल्या नवीन चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. कियारा या दिवसात “जुग-जुग जियो” या फिल्मचे शूटिंग करत आहे. या चित्रपटामध्ये कियारासोबत अन्य कलाकार आहेत, वरुण धवन, नीतू कपूर आणि अनिल कपूर हेसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

राज मेहताने दिग्दर्शन केलेला हा आगामी चित्रपट ही एक रोमॅण्टिक कॉमेडी असून कियारा अडवाणी आणि वरुण धवन या फिल्ममध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर नीतू कपूर आणि अनिल कपूर हे वरुणच्या आई-वडिलांच्या भूमिकेत असणार आहेत.

दरम्यान कियाराने असे सांगितले की वरुण धवनही तिला कायम मध्यरात्री फोन करतो. कियारा म्हणाली, की वरुण तिला कथानाकाच्या गोष्टीबद्दल व नोट्सच्या देवाण-घेवाणीबद्दल बोलत असतो आणि फोनवर पुढील दिवसाचा सीन कसा करायचा, काय महत्वाचे आहे त्याबद्ल बोलत असे.

कियारा म्हणाली की मध्यरात्री देखील फोन करून तो अभिनयाबद्दल आणि कामाबद्दलच विचार करत असतो. इतकेच नाही, तर कियारा पुढे म्हणाली की अनिल कपूरसुद्धा या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. काम करण्याची खूपच आवड असणाऱ्या या कलाकारांसोबत मला काम करायला मिळते आहे, त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते, असे कियाराने म्हटले आहे.

या चित्रपटात काम करतानाच नितू कपूर आणि वरुण धवन हे दोघेही थोड्याच दिवसांपूर्वी कोरोनाग्रस्त आढळले होते. त्याच वेळी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला देखील कोरोना झाला होता. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचे चित्रीकरण थोड्या कालावधीसाठी थांबवले होते.

सूत्राच्या माहितीनुसार आता या चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरू झाले आहे. कियाराच्या आताच्या चित्रपटाबद्दल बोलले तर तिचे सध्या “जुग जुग जिओ” या चित्रपटाचे चित्रीकरण चालू आहे. तसेच “शेरशाह” मधील प्रमुख भूमिकेत ती सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याबरोबर दिसणार आहे.

याशिवाय ती अनीस बज्मीच्या “भूल भुलैया” या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि तब्बूसुद्धा तिच्यासोबत काम करणार आहेत आणि वरुण धवनबद्दल सांगायचे झाले, तर अखेर वरुणने आपली गर्लफ्रेंड नताशा दलालबरोबर लग्न केले आहे. अलिबाग येथे त्यांचा हा लग्नसोहळा पार पडला.

वरुण धवनने इन्स्टाग्रामवरुन आपल्या लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. वरुण आणि नताशा दलाल गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. बॉलिवूडमधील हे नवे जोडपे फारच क्यूट दिसत आहे. इंटरनेटवर वरूण व नताशाच्या लग्नाच्या फोटोंनी एकच कल्लोळ घातला आहे.

मिस्टर अॅटण्ड मिसेस धवनवर त्यांचे चाहते शुभेच्छांचा पाऊस पाडत आहेत. अर्थात काही जण वरूण व नताशाच्या लग्नाचे फोटो पाहून काहीसे नाराज पण आहेत. नव्या नवरीचा लूक आणि तिचा पेहराव खूप लोकांना आवडला नाही. यावरच्या बर्यााच प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

यांचा विवाहसोहळा अतिशय वैयक्तिक ठेवण्यात आला होता. सोहळ्यांचे फोटो कुठे दिसू नयेत म्हणून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अगदी मोबाईल वापरण्याला सुद्धा मनाई करण्यात आली होती.

रात्री उशीरा वरूण व नताशाने लग्नाचे काही फोटो अधिकृतपणे आपल्या अकाऊंटवर शेअर केलेत. शिवाय लग्नानंतर वरूण व नताशा यांनी बाहेर येत मीडियाला फोटोसाठी पोज दिल्यात. बाहेर खूप वेळ ताटकळत उभ्या असलेल्या मीडियाला मिठाई लाडू वाटण्यात आले.